अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर; शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार? Relief funds for farmer

Relief funds for farmer : जून ते सप्टेंबर २०२४ च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील २३ हजार ६५ बाधित शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २५ लाख ६१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी ४७ हजार रुपये या दराने मदत देण्यात येणार आहे. मदत मात्र ५ हजारांपेक्षा कमी नसावी, असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते, असं शेतकरी सांगतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहतात. Relief funds for farmer

जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकांसह शेत जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला होता. त्यावर तातडीने मदतीची मागणी शेतकरी करत होते. त्यावर अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. Relief funds for farmer

कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

एकूण चार विभागातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपुर, नागपूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.

कोणत्या जिल्ह्यांना किती निधी?

जून ते सप्टेंबर २०२४ च्या दरम्यान शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावानुसार २९ कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १४३ शेतकऱ्यांसाठी १३ लाख १ हजार रुपये, पुणे जिल्ह्यातील ७६५ शेतकऱ्यांना ३६ लाख ८५ हजार, सातारा जिल्ह्यातील ५५९ शेतकऱ्यांना २० लाख ३५ हजार रुपये, सांगली जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ३८५ शेतकऱ्यांना ११ लाख ५५ हजार रुपये, वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४०४ शेतकऱ्यांना १ कोटी ४८ लाख ८९ हजार रुपये, चंद्रपुर जिल्ह्यातील ५ हजार ३८५ शेतकऱ्यांना ७ कोटी ६५ लाख १८ हजार रुपये, नागपूर जिल्ह्यातील ८७५ शेतकऱ्यांना १ कोटी ४२ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर अमरावती जिल्ह्यातील ३९६ शेतकऱ्यांना ३५ लाख ८३ हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील ८६५ शेतकऱ्यांना ५८ लाख ४२ हजार रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ३ कोटी ३६ लाख ७१ हजार रुपये, वाशिम जिल्ह्यातील २८६ शेतकऱ्यांना २ लाख ८७ हजार रुपयांच्या निधीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच परभणी जिल्ह्यातील १ हजार ६०७ शेतकऱ्यांना २ कोटी ६७ लाख २३ हजार रुपये, लातूर जिल्ह्यातील ३ शेतकऱ्यांना १४ हजार रुपये, हिंगोली जिल्ह्यातील ५ हजार ११४ शेतकऱ्यांना ६ कोटी ६४ हजार ९१ हजार रुपये, धाराशिव जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांना २ लाख ६१ हजार रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील १ हजार ८८७ शेतकऱ्यांना २ कोटी ८५ लाख ३ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात जून ते सप्टेंबर २०२४ कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते. परंतु राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली नाही. आता अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु तोही तुटपुंजा आहे, असं शेतकरी सांगतात.

दरम्यान, राज्यात जून ते सप्टेंबर २०२४ कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते. परंतु राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली नाही. आता अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु तोही तुटपुंजा आहे, असं शेतकरी सांगतात.

Leave a comment