Crop Insurance : या जिल्ह्यात खरीप पीकविम्यासाठी २ लाख १० हजार शेतकरी पात्र

Crop Insurance सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागच्या खरीप पीकविम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापासून विम्याच्या रकमेचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख १० हजार ६६३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार असून, एकूण २८२ कोटी २० लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

जिल्ह्यातील ७ लाख ३३ हजार ९५३ शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा योजनेत भाग घेतला होता. जिल्ह्यात उत्तरापाठोपाठ हस्त नक्षत्राच्या पडलेल्या मोठ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळविली होती.

त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे विमा कंपनीकडून पंचनामे करण्यात आले. पिकांचे नुकसान झालेल्यांमध्ये प्रामुख्याने बार्शी, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश आहे. सोयाबीन, उडीद, तूर, मका, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. Crop Insurance

खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने त्यांच्या विषयाची विम्या हप्त्याची रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीकविमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a comment